• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणून घ्या; भगवान गडाचा इतिहास नेमका काय आहे? कोण होते भगवानबाबा?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 15, 2021
in राजकीय
0
जाणून घ्या; भगवान गडाचा इतिहास नेमका काय आहे? कोण होते भगवानबाबा?
Spread the love

बीड राजमुद्रा दर्पण । बीड जिल्ह्यात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील चार मेळावे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा. दुसरा नागपूरच्या रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा. तिसराही नागपूरच्याच दीक्षाभूमीवरील आंबेडकरी जनतेचा धर्मांतर सोहळ्याचा मेळावा आणि चौथा म्हणजे भगवान गडावर होणारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. या चारही मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जातं. त्यातही भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवान गडावरील मेळाव्यावरून झालेल्या वादानंतर भगवान गड अधिक चर्चेत आला. भगवान गडचा इतिहास नेमका काय आहे? भगवानबाबा कोण होते?

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात सावरगाव आहे. या ठिकाणी भगवानगड आहे. भगवान बाबांच्या नावाने हा गड ओळखला जातो. या ठिकाणी भगवान बाबा वास्तव्याला होते. या गडाला पूर्वी धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणूनही ओळखलं जायचं. मात्र, भगवानबाब या ठिकाणी वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी या जीर्ण गडाची डागडूजी सुरू केली. त्यामुळे या गडाला भगवानबाबांच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर 1958 मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचं उद्घाटन करण्यात आलं होतं.

भगवानबाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. ते मूळचे सावरगाव घाट येथील. त्यांनी या धौम्यगडावर येऊन सातत्याने कीर्तन, प्रवचन केले. या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली. त्यामुळे धौम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला. भगवानबाबांचे निधन 1965 साली झाले. त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली. त्यानंतर 2003 पासून नामदेव महाराज शास्त्री हे गडाचं काम पाहत आहेत.

भगवान गडावरील मेळाव्याला 50 वर्षाची परंपरा आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता.

गोपीनाथ मुंडे हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळावा साजरा करायचे. 1994पासून त्यांनी ही परंपरा सुरू केली. अनेक वर्ष त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली. मुंडे यांच्या निधानानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली. मात्र, 2016मध्ये या मेळाव्याला वादाचे गालबोट लागले. गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिला. त्यामुळे वाद झाला. मात्र, त्यानंतरही पंकजा यांनी पाथर्डी येथील भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केलं. मात्र, 2017मध्ये दसरा मेळावा कुठे घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मस्थळी म्हणजे पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. सावरगाव घाट हे भगवानगडापासून 50 किलोमीटरवर आहे. पंकजांनी या ठिकाणाहून नव्या परंपरेला सुरुवात केली.

सावरगाव हे भगवानबाबांचं जन्मगाव. या गावी अडीच एकरामध्ये भगवानबाबांचे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्यांच्या जुन्या वाड्याची डागडूजी करण्यात आली. समाधी मंदिरही तयार करण्यात आलं. अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी भगवानबाबांची 25 फुटांची मूर्ती बनवली. पंकजा मुंडे यांनी सावरगावात दुसरा भगवान भक्तीगड निर्माण केला. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडाचा विकास केला, तर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मभूमीच्या विकासाकडे लक्ष दिले आहे. या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भव्य व्यासपीठही उभारले आहे. 2017पासून या नव्या भगवान भक्तीगडावर त्यांनी दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडित झाली. पंकजा मुंडे यांना ऑनलाईन मेळावा घ्यावा लागला होता.

 

Previous Post

शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, त्यांच्यासोबत दौऱ्यावर कोण कोण?

Next Post

आगामी निवडणुकीत आमचे 22 खासदार होणार, शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल – संजय राऊत

Next Post
आगामी निवडणुकीत आमचे 22 खासदार होणार, शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल – संजय राऊत

आगामी निवडणुकीत आमचे 22 खासदार होणार, शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!