• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 18, 2021
in राजकीय
0
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांचा आमच्याविरोधात वापर करता ना. मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप पॉवरफुल्ल लोकं आहेत. अतिरेकी पळून जातील. ते आमच्यावर ज्या प्रकारे ईडी, सीबीआयच्यामाध्यामातून हल्ला करता, या तिन्ही चारही संस्था तुम्ही बदनाम केल्या आहेत. या संस्थांचा तुम्ही राजकीय गैरवापर केला आहे. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. आम्ही अतिरेक्यांची कागदपत्रे देऊ. फिरत बसतील काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला. जा म्हणा, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद परत निर्माण झाला. त्याला तणाव म्हणता येत नाही. मोहन भागवत यांनी ज्वलंत सत्य मांडलं. 370 कलम हटवून सुद्धा जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीत सुधारणा होऊ शकली नाही. आजही अतिरेक्यांचं तांडव हैदास सुरू आहे. कधी शिखांचं हत्याकांड होतंय, कधी कश्मीरी पंडितांना मारलं जातंय. काल दोन बिहारचे मजूर मारले जात नसेल तर याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. यावर तोडगा निघाला नाही तर नुसत्या पाकिस्तानच्या बाबतीत धमक्याची भाषा वापरून हे थांबलं जाणार नाही. सर्जिकल स्ट्राईक करू. मग चीनवरही करा. चीन लडाखमध्ये घुसलंय, तवांगमध्ये घुसलं. मग चीनवर स्ट्राईक करू सांगा. काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असं त्यांनी सांगितलं.

तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे मतलाबाप्रमाणे निर्णय घेता काश्मीरची जनता रोज मरतेय हे चालणार नाही. आम्ही काय ठोस भूमिका घेणार? ठोस भूमिका सरकारने घ्यायची आहे. सरकार कुणाचं आहे? विरोधकांनी ठोस भूमिका घ्यावी असं कसं म्हणू शकता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

परिस्थिती आटोक्यात आली की नाही सांगू शकत नाही. कारण परिस्थितीबातबच्या बातम्या बाहेर येऊ दिल्या नाही. तिथलं इंटरनेट बंद होतं. तिथल्या मीडियावर बंधनं होती. लोकांच्या हालचालीवर बंधनं होती. नेते कैदेत होते. त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या नाही. 370 कलम हटवून सरकारने लोकांच्या भावनाला चालना दिली. आम्हीही पाठिंबा दिला. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करत होतं? केंद्रीय गृहमंत्र्यांनी काश्मीरच्या परिस्थितीबाबत सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

पाकिस्तानसोबत कोणताही संबंध नको अशी आमची भूमिका राहिली आहे. व्यापारिक, राजनितीक आणि सांस्कृतिक संबंध ठेवू नका ही आमची भूमिका राहिली आहे. तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन केक कापता. त्यांना मिठ्या मारत्या. आम्ही नाही करत हे. तुम्ही सांगा काय करणार आहात. जम्मू-काश्मीरमध्ये खूनखराबा होत आहे. दुबईत क्रिकेट खेळता की खेळत नाही ते सांगू नका. जम्मू काश्मीरवर बोला. क्रिकेट खेळल्याने प्रश्न सुटणार नाही.

 

Previous Post

कॉग्रेसने भाजपला कामाला लावले, आगामी काळ स्पर्धेचा ; यश – अपयश क्षणिक…

Next Post

राज्यातील निर्बंध आणखी शिथिल होणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्कफोर्ससोबत बैठक

Next Post
राज्यातील निर्बंध आणखी शिथिल होणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्कफोर्ससोबत बैठक

राज्यातील निर्बंध आणखी शिथिल होणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्कफोर्ससोबत बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!