• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जर कर्जमुक्ती; तर मग का आत्महत्या करतोय शेतकरी?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 21, 2021
in जळगाव
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)

2020 या शासकीय वर्षात कोरोनाच्या महामारीने सर्वांना चांगलाच झोडपून काढला आहे. त्यातल्या त्यात जिल्ह्यातील परिस्थिती फारच बिकट होती. भरीसभर नैसर्गिक आपत्ती, ज्यात कोरडा दुष्काळ आणि बेमोसमी अवकाळी पाऊस यांनी शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. मग अशा परिस्थितीत उत्पन्न कमी परिणामी शेतमालालाही बाजारभाव कमीच. वर शासनाची अत्यल्प मदत, जी कधी मिळते तर कधी मिळतही नाही. या साऱ्या गराड्याखाली दाबल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणामुळे २०२० या आर्थिक वर्षात १४१ शेतकऱ्यांनी आपल्या जीवनयात्रा संपवल्या. हा झाला फक्त या वर्षाचा आकडा. मात्र गेल्या तीन वर्षांचे आकडे लक्षात घेतले तर लक्षात येते की २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षातही अनुक्रमे १४८ आणि १२६ शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात झाल्याचे लक्षात येते. म्हणजे २०१७ ते २०२० या तीन वर्षांच्या काळात कर्जमुक्ती होऊनही ४१५ शेतकऱ्यांची कुटुंबे निराधार झाली आहेत. हा आकडा सुन्न करणारा आहे.

बरं शासनाकडून अनुदान मिळते असं लक्षात आलं; पण या लाखभराच्या मदतीसाठी शेतकरी कोणत्या स्तरावर भरडला जातो याचा अंदाज तो शेतकरीच काय तो लावू शकतो. कारण वास्तविक पाहता ४१५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबात पैकी फक्त 2४४ कुटुंबांना शासकीय एक लाख रुपयाची अनुदानित मदत मिळाली. मात्र उरलेले १७१ आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे प्रस्ताव हे अपूर्ण कागदपत्रे, अयोग्य पद्धतीचे पंचनामे आणि पुरेशा पुराव्यांअभावी शासन स्तरावरून सहज फेटाळले गेले. म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी ही आत्महत्याच करावी आणि हा वारसा पुढे चालवायचा का? लाखभराच्या तुटपुंज्या मदतीने गेलेला जीव तरी परत येणार का? प्रश्न भेडसावणारे आहेत.

जिल्ह्यातील पंधराशे पेक्षा जास्त गावांपैकी काही क्षेत्र वगळली तर इतर सर्व क्षेत्रे ही अवर्षणप्रवण म्हणून घोषित आहेत. २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तसेच नैसर्गिक संकटात पिकांच्या नुकसानीची शासनाकडून फक्त ३९ कोटी या अत्यल्प किमतीची मदत मिळाली. सप्टेंबर २०१९ मध्ये अकराशे कोटींपेक्षा जास्तची रक्कम आपत्ती नुकसान भरपाई म्हणून जाहीर झाली. जी आजही शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. याच काही महत्वाच्या कारणाने शेतकरी कर्जाचा मार्ग अवलंबतो आणि फेडता न येण्याच्या कारणापायी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. मात्र शासनाला हा फक्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा काय तो वाटतो.

खते, बी-बियाणे, मजुरीचा खर्च यांची जमवाजमव करण्यासाठी शेतकरी बँकांच्या कर्जांवर विश्वास ठेवतो. मात्र या बँकाही त्याच्या कर्जाला बऱ्याचदा नामंजूरच करतात. मग शेतकरी प्रशासकीय सेवा शोधतो, ज्या त्याला कारण नसताना फिरफिर करायला लावतात. शेवटी नैसर्गिक आपदा, त्यामुळे येणारे अत्यल्प उत्पादन, बाजारातला शेतमालाचा कमी बाजारभाव अशा सर्व कारणांची एकत्रित सांगड ही फक्त शेतकऱ्यांच्या अंतयात्रेवर येऊन पोहोचते; आणि मग निर्माण होणारी परिस्थिती शासन ‘शेतकरी आत्महत्या’ या शब्दाखाली आकडा म्हणून सहज सोडून देते. आता हे चित्र नेमकं कधी बदलणार हा एक अनुत्तरित प्रश्न बनून राहिला आहे.

Tags: karjamuktishasakiy anudanshetkarishetkari aatmahatya
Previous Post

‘राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महानगर अध्यक्ष’ पदावर जितेंद्र चांगरे

Next Post

माहेश्ववरी समाजातफे वाढदिवसानिमित्त गरजूंना मठ्ठा वाटप

Next Post

माहेश्ववरी समाजातफे वाढदिवसानिमित्त गरजूंना मठ्ठा वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!