• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सरकारकडून बळीराजाची फसवणूक; खा.उन्मेष पाटील यांचा आरोप…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 22, 2021
in राजकीय
0
महाविकास आघाडी सरकारकडून बळीराजाची फसवणूक; खा.उन्मेष पाटील यांचा आरोप…
Spread the love

नाशिक राजमुद्रा दर्पण । महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या भ्रष्ट, नाकर्त्या आणि कोडग्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले, महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली आहे. पीक विमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले. असा आरोप खा.उन्मेष पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. यावेळी आ.सीमा हिरे, सरचिटणीस पवन भगुरकर, सुनिल बच्छाव, देवदत्त जोशी, प्रविण अलई आदी उपस्थित होते.

खा. उन्मेष पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता, त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने १० हजार कोटींची मदत जाहीर केली होती. त्या आधी जुलै मध्ये पूर आणि पावसाचा फटका बसलेल्यांना ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. या मदतीमधील ७ हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तर ३ हजार कोटी पुनर्बांधणी, पुनर्वसनासाठी आहेत. याचा अर्थ पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांसाठी केवळ १५०० कोटींची मदत करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात ५० लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झालेली आहे, जनावरे वाहून गेली, घरे पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांच्या या नुकसानीची विचारपूस देखील सरकारने केली नाही. मदतीची द्यायच्या वेळी आली कि, हि आमची जबाबदारी नसून केंद्र सरकारची जबाबदारी असे सांगत २ वर्ष घालवले. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात बंद पाळणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेतृत्वाला नैसर्गिक आघाताचा मारा सहन करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी वेळ काढता आला नाही, असेही खा. उन्मेष पाटील म्हणाले.

मोठेपणा करून जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीही आघाडी सरकारला प्रत्यक्षात आणता आलेली नाही. आघाडी सरकारने कर्जमाफीसाठी फक्त १५० कोटींची तरतूद केली आहे. महाआघाडी सरकारने पीक विमा काढणाऱ्या कंपन्यांना फायदेशीर अटी तयार केल्याने राज्यातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विमा काढलाच नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना २०१९-२० या वर्षी ८५ लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी भरपाई मिळाली होती. त्यावर्षी पीक विमा कंपन्यांना १ हजार कोटींचा तोटा झाला होता. या सरकारने पीक विमा कंपन्यांशी तीन वर्षांसाठी उंबरठा उत्पादन गोठवून करार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी फक्त १५ लाख शेतकऱ्यांना ९७५ कोटी रु. ची भरपाई विमा कंपन्यांकडून मिळाली. मात्र विमा कंपन्यांना मागील वर्षी ४ हजार कोटींहून अधिक नफा मिळाला. कोरोना काळात देखील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट आले तेव्हा महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, या सर्वाना कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. असा देखील आरोप खा. उन्मेष पाटील यांनी केला.

 

Tags: bjpkendra sarkarkha. unmesh patilmahavikas aaghadi sarkarnashik
Previous Post

लातूर जिल्हा बँकेत काँग्रेसच्या सहकार पॅनेलचा 18 जागांवर विजय….

Next Post

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार; तरी भाजपने काढला पळ,एकनाथ खडसे यांची टीका

Next Post
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार; तरी भाजपने काढला पळ,एकनाथ खडसे यांची टीका

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार; तरी भाजपने काढला पळ,एकनाथ खडसे यांची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!