• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हॉट्सअ‌ॅपची केंद्राच्या नव्या नियमावली विरोधात याचिका दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 26, 2021
in राष्ट्रीय
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा)

केंद्र सरकारने नवीन डिजिटल नियमावली सादर केल्याबाबत याविषयी जोरदार चर्चा सुरू असून बऱ्याचअंशी विरोधही दिसून येत आहे. या नियमांच्या विरोधात बहुचर्चित मेसेजिंग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅप कोर्टात गेले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर होणाऱ्या परिणामांचा हवाला दिला आहे. आजपासून लागू होणाऱ्या नियमावलीविरोधात अ‌ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून हे नियम वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची सुरक्षा खंडित करण्यास भाग पाडतील, असे व्हॉट्सअ‌ॅपने म्हटले आहे.

फेसबुकच्या मालकीच्या कंपनीने मंगळवारी हा खटला दाखल केला आहे. या नियमांनुसार व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन अत्यावश्यक काम लागू होईल. अ‍ॅपवर विशिष्ट संदेश कोठून आला हे व्हॉट्सअ‍ॅपला सांगावे लागणार असल्याने नागरिकांमध्ये, नेमकं काय होणार आणि काय नाही याबाबत संभ्रम निर्माण झालं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “गप्पांना ट्रेस करण्यास भाग पाडणारा हा कायदा व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर फिंगरप्रिंट ठेवण्यासारखा आहे. जर आपण हे केले तर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन निरर्थक होईल आणि लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे देखील उल्लंघन केले जाईल.”

“आम्ही आमच्या नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी नागरी समाज आणि जगभरातील तज्ज्ञांसमवेत सतत आवाज उठविला आहे. यादरम्यान, आम्ही या समस्येवर व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी भारत सरकारशी बोलणी सुरू ठेवू, जेणेकरुन आम्ही लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण करू शकू आणि आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार वैध कायदेशीर विनंत्यांना सहकार्य करू.” अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने कोर्टाला विनंती केली की, नवीन नियमांना भारतीय घटनेतील गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे जाहीर करावे. कारण सोशल मीडिया कंपन्यांसमोर अशी अट ठेवण्यात आली आहे की, संबंधित अधिकाऱ्याने विचारले तर ‘फर्स्ट ओरिजिनेटर ऑफ इन्फॉर्मेशन’ म्हणजे प्रथम विशिष्ट संदेश कोणी पाठवला, हे शोधावे लागेल. यावरून नागरिकांच्या गोपनियतेवर प्रश्न निर्माण होण्याचे संकेत दिसून येत आहेत.

Tags: high courtindiarajmudrawhat's app
Previous Post

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शिवाजी नगर पुलाची समिती बैठक

Next Post

सोनू जलानचा परमबीर सिंग यांच्यावर खळबळजनक आरोप

Next Post

सोनू जलानचा परमबीर सिंग यांच्यावर खळबळजनक आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!