• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ सूचनांचे पालन करा; १जुलै नंतर कोरोना राहणार नाही

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 27, 2021
in राष्ट्रीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय वंशाचे अमेरिकेतील पेनिसेल्वेनियात डॉक्टर असलेल्या रवी गोडसेंनी आपण सांगितलेल्या पाच गोष्टींची अंमलबजावणी केली, तर एक जुलैला भारतातून कोरोना संपेल आणि लोकांना मास्कचा वापर करावा लागणार नाही. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा काही धोका नसल्याचा दावा केला आहे.
प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून डॉ. रवी गोडसे यांची ओळख आहे. त्यांनी या आधीही कोरोना संबंधी व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक सूचना केल्या आहेत.

भारत सरकारसाठी गोडसेंनी पाच सूचना केल्या असून त्यांचे जर पालन केले, तर येत्या १ जुलैपर्यंत भारतातील कोरोना संपेल तसेच ऑक्टोबरपर्यंत लोकांना मास्क वापरायची गरज भासणार नाही, सोबतच भारतात कोरोनाची तिसरी लाटच येणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कोरोनाची तिसरी लाट देशभर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर डॉ. रवी गोडसे म्हणाले की, जरी कोरोनाची तिसरी लाट आली नाही, तरी लहान मुलांना थोडासा धोका आहेच. आतापर्यंत घरी बसलेली मुले अचानक ग्राऊंडवर खेळायला गेली, तर त्यांना कमी असेना पण काही प्रमाणात धोका असल्याचे गोडसे यांनी म्हटले आहे.

या आहेत त्या पाच सूचना

◆ जनतेला कोरोनाबद्दल दररोज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती द्या.
◆ मंजुरीच्या प्रतिक्षेत जेवढ्या काही लसी आहेत त्या सर्वांच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्या.
◆ लसीकरण असेल वा कोरोनाचे उपचार, खासगी क्षेत्रालाही त्याची परवानगी द्या. त्यामुळे गती वाढेल.
◆ मोनोक्लोनल प्रक्रियेला प्रोटोकॉलनुसार परवानगी द्या. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल. गेल्या वर्षीच अमेरिकेत मोनोक्लोनलला परवानगी देण्यात आली आहे.
◆ लाल फितीचा कारभार बंद करा आणि सर्वांचे लसीकरण करा.

जर या दिलेल्या तारखा खोट्या ठरवायच्या नसतील, तर या सूचनांचे लगेच पालन करा, असेही डॉ. रवी गोडसे म्हणाले आहेत. मात्र तज्ञ वैज्ञानिक म्हणून ओळख असलेल्या गोडसे यांच्या या वक्तव्यावर भारत सरकार कितपत लक्ष देणार हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.

Tags: coronacorona lasikaranindiaravi godseUSA
Previous Post

राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला रत्नागिरीत अटक

Next Post

जिल्ह्यातील ढवळून निघालेले राजकारण ; आमदार महाजनांच्या भूमिकेकडे लक्ष..!

Next Post

जिल्ह्यातील ढवळून निघालेले राजकारण ; आमदार महाजनांच्या भूमिकेकडे लक्ष..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!