जळगाव राजमुद्रा दर्पण : संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत कालबाह्य ठरल्यानंतर ती वाचण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या असमर्थ ठरत असताना २०१३ मध्ये किरीट सोमय्या पुढे आले. आणि आयएनएस विक्रांत वाचण्यासाठी देशप्रेमाची हाक देताना मोठ्या प्रमाणात निधी संकलित केला. यासाठी त्याने रेल्वे स्थानके, विमानतळांवर उभा राहून खंडणी वजा रक्कम जमा केली. असा आरोप सोमय्या यांच्यावर शिवसेने कडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात शिवसेनेकडून आंदोलने तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
यामध्ये नागरिकांनीही देश प्रेमापोटी सढळ हस्ते मदत केली. नौदलाच्या कित्येक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी पाच ते दहा हजार रुपयेपर्यंत रक्कम आयएनएस विक्रांत वाचण्याच्या मोहिमेत दिले. मात्र या मोहिमेत एकूण किती रक्कम जमा झाली,या रकमेचा विनियोग कसा करण्यात आला हे आजपर्यंत सोमय्या यांनी कधीही उघड केलेले नाही. ही रक्कम जमा करत असताना आयएनएस विक्रांतचे भव्य युद्धनौकेत रूपांतर करून सदर निधी राजभवनात जमा करणार असल्याचे त्या वेळी सांगितले होते. मात्र माहिती अधिकारातून घेण्यात आलेल्या माहितीतून धक्कादायक सत्य बाहेर आले. त्यानुसार किरीट सोमय्या यांनी सदर निधी राजभवनावर जमाच केलेला नाही.तसेच राजभवनावर कुठल्याही प्रकारचा धनादेश अथवा धनाकर्ष जमा करण्यात आला नसल्याचे धक्कादायक सत्य लेखी उत्तराद्वारे अवगत करण्यात आलेले आहे. सदर जमा रक्कम ही साधारणतः १०० कोटी रुपये इतकी प्रचंड असून अशावेळी सदर रक्कम राजभवनावर जमा न करता स्वतःची व पक्षाची तुंबडी भरलेली आहे असा संशय सेनेकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
सामान्य नागरिकांच्या देशप्रेमाच्या भावनेशी त्याने खेळ खेळलेला असून त्याच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर रक्कम व्याजासह वसूल करून शासकीय तिजोरीत त्वरित जमा करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना पक्षाच्या सर्व संघटना त्यांचे पदाधिकारी, यांनी दिनांक ७ एप्रिल रोजी दुपारी ११ वा आपल्या तालुक्यातील शहराचा मुख्य चौकात आंदोलन करुन संबंधित पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करावा
या मागणी ची फिर्याद तयार करुन देण्यात यावी व किरीट सोमय्या यांची अटकेची मागणी करावी. असे आवाहन शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना करण्यात आला आहे.
आंदोलनात जास्तीत जास्त महिला/पुरुष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,शिवसैनिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख .संजयजी सावंत, सहसंपर्क प्रमुख शगुलाबराव वाघ, जळगाव जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे , हर्षल माने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.