पुणे राजमुद्रा दर्पण | आता सर्वसामान्यांच्या ताटातील चापतीचे प्रमाण कमी होणार आहे. कारण स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानात मिळणाऱ्या गव्हाच्या प्रमाणात कमतरता करण्यात आल्याची माहिती मिळाली दिली आहे. स्वस्त दुकानात आता गहू कमी मिळणार आहे. सर्वसामान्यांना आधार असलेल्या रेशनवरील गहू कमी झाला आहे. रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. खुल्या बाजारात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. या युद्धाचा भारतातही परिणाम दिसून येत आहे.
बाजारातून गहू खरेदी करणे न परवडणार्या व्यक्तींसाठी रेशनचा पर्याय लाभदायक ठरतो. परंतु आता पुरवठा विभागाने रेशनवरील गहू (wheat) कमी करुन त्याऐवजी तांदूळ ( rice) देण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु आहे. रेशन दुकानात प्रती कुटुंब 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिला जात होता. मात्र आता 1 किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश दिले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. प्राधान्य कुटुंबांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिले जात होते. त्याऐवजी आता एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती हाती आली आहे.