मुंबई राजमुद्रा दर्पण | मुंबई आणि इतर ठिकाणांमध्ये उकाडा जानवत होता मुंबईमधील प्रत्येक नागरिकाचे डोळे आकाशाकडे लक्ष लावून होते. अरे बाबा आता तरी बरास! असं म्हणत प्रत्येकजण मान्सूनला मनापासून बोलवत होते.
सायंकाळी पावसाचे ढग मुंबई आणि उपनगरीय भागांना भरून गेले आणि आग ओकणारा सूर्यही ढगांच्या आड गेला. आता पाऊस येईल… असं वाटत असतानाच या ढगांनी चकवा दिला. अखेर मंगळवारी पहाटे मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली.
वांद्रे ते परळ भागात मंगळवारी तुरळक पाऊस झाला. त्याबरोबरच भांडुप घाटकोपरदरम्यानही पावसाच्या सरी बरसल्या. पण, हा मान्सून नसल्याचीच माहिती हवामान खात्याने स्पष्ट केली.
मुंबई, ठाणे, पालघर, डहाणू पुणे जिल्ह्याचा काही भाग, नाशिक जिल्ह्याचा औरंगाबाद या भागात दिवसा ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असं उपग्रहावरून छायाचित्रांच्या आधारे भारतीय हवामान विभागाच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. रिमझिम पावसाला मान्सून समजण्याची चूक तुम्ही करत असाल, तर थांबा. कारण, हा मान्सून नाही. सध्या संपूर्ण MMR परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळं उकाड्यानं हैराण मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत आहे.
तसेच नागपूर चंद्रपूर भागातही तुरळक पाऊस बरसण्याची हवामान खात्याने दिशा वर्तवली आहे.