मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागापूर खणिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्तांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहे.
या तक्रारीची देसाई यांनी तात्काळ दाखल घेऊन उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंग यांना पुढील कारवाईचे आदेश दिले आहे. त्यानुसार शासनाने याप्रकरणाचा चौकशी साठी नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एक सदस्यीय समिती गठीत केली आहे. दरम्यान महाजनको आणि नागपूर खणिकर्म महामंडळ यांच्यात हि प्रक्रिया राबवण्यात आली. प्रक्रियेशी राज्यशासनाच्या थेट सम्बन्ध असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.