राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी उरला असताना महाविकास आघाडी ऍक्टिव्ह मोडवर आली आहे.. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बोलणी शेवटच्या टप्प्यात आली असून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सूत्रांकडून समजला आहे.. या जागा वाटपामध्ये 119-86-75 अशा पद्धतीने जागावाटप करायचे ठरवल्याची माहिती काँग्रेसच्या वर्तुळातून समोर आली आहे. या विधानसभा निवडणुकीला काँग्रेस 119, शिवसेना ठाकरे गट 86 आणि शरद पवार गट 75 जागा लढवेल, असे सांगितले जात आहे. तर शेकापला 3, समाजवादी पक्ष 3 आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गट 10 पैकी 8 जागा जिंकत स्ट्राईक रेटच्या गणितात सरस ठरला होता. तरीही शरद पवार गटाने विधानसभेच्या जागावाटपात सर्वात कमी म्हणजे 75 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. शरद पवार यांची ही भूमिका राजकीय वर्तुळाला बुचकाळ्यात टाकणारी आहे. यामागे शरद पवार यांची काय राजकीय समीकरणे आहेत, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली आहे.