राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असताना महायुती आणि महाविकास आघाडी जोमाने तयारीला लागली आहे. अशातच महायुती विरोधात तिसरी आघाडी निर्माण करून प्रहारचें बच्चू कडू यांनी दंड थोपटले आहेत. या तिसऱ्या आघाडीवरून आता भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी टीकेची झोड उठवत आघाडीवर हल्लाबोल केला आहे..बच्चू कडू यांची तिसरी आघाडी पूर्णपणे फ्लॉप होणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. त्याच्यामुळे युतीच्या उमेदवारास फटका बसला. तिसरा आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू मांडवली करून चुपचाप बसले आहेत. दुसरीकडे ते एकनाथ शिंदेंना पाठिंबा मागत आहे. गेल्या वीस वर्षांत बच्चू कडू यांच्या मतदार संघात विकास कामे झाले नाही. ते गारुडी असणारे व्यक्तीमत्व आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला. त्यांच्या या दाव्याला आता बच्चू कडू काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आमदार रवी राणा यांनी बोलताना काही दिवसांमध्ये तिसरी आघाडी फ्लॉप झालेली दिसेल असेही म्हटल आहे.. तसेच बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणतात की, अचलपूरमध्ये मला पाठिंबा द्या. मेळघाटमध्ये राजकुमार पटेल यांना पाठिंबा द्या. परंतु काही दिवस थांबा. बच्चू कडू कधी पण तिसरी आघाडीतून ‘यू टर्न’ घेऊन वर्षा बंगल्यावर सरेंडर होतील, हे तुम्हाला दिसणार आहे. असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे..
दरम्यान याआधी बच्चू कडू यांनी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी या दोघांना आम्ही पराभूत करणार आहोत. सर्वत्र तिसऱ्या आघाडीचा डंका दिसणार आहे, असे म्हटलं होतं.