जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी धरणाचे १२ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज (ता.२२) रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात १९४२३ क्युसेक पाणी सोडण्यात आले. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हतनूर धरणाच्या गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी केले असल्याची माहिती शाखा अभियंता एन पी महाजन यांनी दिली.