रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | येथील नागरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियानास प्रारंभ झाला असून शासनाच्या निसर्ग बचाव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण व वसुंधराचे संरक्षण करून जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाचा एक भाग आहे याचा संदेश पालिकेतर्फे देण्यात आला.
रावेर नागरपालिकेतर्फे मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ जून पासून शहरातील विविध भागात व मोकळ्या जागेमध्ये या अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याची सुरुवात नेमाडे प्लॉट येथील ओपन स्पेस व रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करून करण्यात आली. वृक्षारोपण केलेल्या झाडांना पालिकेच्या नागरी घनकचरा प्रकल्पावर ओल्या कचऱ्यापासून बनविण्यात आलेले खत झाडांना टाकण्यात आले.
यावेळी नगरसेवक शेख सादिक, प्रदिप महाजन, कार्यालयीन अधिक्षक सरफराज तडवी, शामकांत काळे, प्रमोद चौधरी, पी. आर. महाजन, शहर समन्वयक वैभव नेहेते यांच्यासह कर्मचारी व पुंडलिक महाजन, ताराचंद बारी, विश्वनाथ भोई, मुन्ना अग्रवाल, अक्षय महाजन, विजय चौधरी, प्रभाकर बारी, आदींसह नागरिक उपस्थित होते.