मुंबई राजमुद्रा दर्पण। आज कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाचे अधिवेशन मागील वर्षाप्रमाणे मुंबई घेण्याची मागणी केली जात होती. मात्र विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर कामकाज समितीने यंदाचे अधिवेशन हे नागपुरात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुका येत्या 10 डिसेंबरला पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात जाण्याची शक्यता होती. मात्र आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठेवण्यात आले आहे. अधिेवेशाचा कालावधी किती दिवसाचा असणार याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही.
अधिवेशन नागपुरामध्ये घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढच्या वर्षी राज्यातील अनेक शहारांच्या महानगर पालिकांच्या निवडणुका देखील होणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्दा देखील गाजत आहे. तसेच राज्यातील गांजा, ड्रग्स या मुद्द्यावरून देखील विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन आक्रमक होणार.