औरंगाबाद राजमुद्रा दर्पण | मनासारखी बायको न मिळाल्याने त्यातच तिच्या काही सवयी पटत नसल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्न झाल्यापासून नेहमी नाराज राहणाऱ्या औरंगाबादमधील नवविवाहित तरुणाने आत्महत्या केली.
या तरुणाने व्हॉट्सअपवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस् माध्यमातुन ठेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील मुकुंदवाडी परिसरात राजनगर येथे समोर आली आहे. अजय समाधान साबळे (वय 25) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बायकोच्या सवयी, स्वभाव पटत नाही असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजनगर भागात आई-वडिलांनासोबत राहणारा अजय प्लंम्बरच काम करून घर चालवत होता. दरम्यान पाच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. तर काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास त्याने आपल्या मोबाईलवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस् ठेवला. त्यामुळे हे स्टेट्स पाहून त्याचा एक मित्र त्याला घरी भेटायला आला. तो त्याच्या खोलीत गेला असता अजयने गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले. तात्काळ पोलिसांना बोलावून संपूर्ण घटना सांगितली आणि लगेचच अजयला रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आत्महत्या करण्याची वेगवेगळी कारणे आपण ऐकत असतो मात्र, बायकोला साडी नेसता न येण्यामुळे आत्महत्या केलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.