• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भावना गवळी यांचा पत्ता कट, यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी?

Team Rajmudra by Team Rajmudra
April 3, 2024
in Uncategorized
0
Spread the love

यवतमाळ (राजमुद्रा) : –       हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भावना गवळी यांचे तिकीट कापलं जाणार आहे. भावना गवळी यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असली तरी भावना गवळी यांनी आपला दावा कायम ठेवला आहे. भावना गवळी या पाच वेळा खासदार आहेत. त्यामुळे त्याचा दावा कायम आहे. भावना गवळी यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. त्यामुळे त्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पण त्यांच्या सर्व्हेमध्ये भावना गवळी यांच्या विरोधात वातावरण असल्याने त्यांचं तिकीट कापलं जाणार अशी शक्यता आहे.

वाशिम-यवतमाळ लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त १ दिवस शिल्लक आहेत. मात्र अजून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याआधी या जागेसाठी संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा होती. पण ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक नसल्याने आता राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे गटाकडून संजय देशमुखांना उमेदवारी

शिवसेना शिंदे गटाकडून अजून उमेदवार जाहीर झाला नसला तरी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे देखील यवतमाळमध्ये आले होते. त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. रोहित पवार यांनी भावना गवळी यांना लक्ष्य केलं.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भावना गवळी यांना अजूनही उमेदवारी जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये ही धाकधूक वाढली आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ आला आहे. त्यामुळे उद्या काही तासात उमेदवार घोषित केला जाऊ शकतो.

भावना गवळी यांनी सलग पाचवेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पण भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याने त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचं सर्व्हेमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे आता कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Previous Post

सर्वात मोठी बातमी, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदारी रद्द, नवा उमेदवार घोषित

Next Post

‘तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतो…’, बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना कळकळीचं आवाहन

Next Post

‘तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतो…’, बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना कळकळीचं आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!