जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । महापालिकेने केलेल्या फेरमूल्यांकानंतर ५५ हजार मालमत्तांची वाढ झाली आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून ४० कॉलनीमधील ३० हजार मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. मनपाकडून या मालमताधारकाकडून कर मूल्यांकन संदर्भात हरकती मागवण्यात येणार आहे. याबाबत सुनावणी घेतल्यानंतर संबंधितांना वाढीव करायचे बिल देण्यात येणार आहे. उत्पन्नाचा असलेल्या मालमत्ता करार वाढीसाठी गेल्या दोन-तीन वर्षापासून पालिका स्तरावर प्रयत्न सुरू आहे. अमरावती येथील स्थापन एजन्सीमध्ये च्या माध्यमातून शहरात सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शहरात एक लाख 16 हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली आहे, त्यात सुमारे 55000 मालमत्तांच्या बांधकामात बदल झाल्याचे मूल्यांकनात आढळून आले आहे त्यामध्ये प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये 30000 धारकांचा समावेश आहे.