सोलापूर राजमुद्रादर्पण । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
महागाईमुळे जनता जेरीस आली आहे. नेहरुंनी विकासाचा पाया रचला मात्र आताचं सरकार काय करतंय? दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हता. नेहरुंनी पाया रचला. केंद्र सरकार काय करतंय? या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे. या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात. मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक आयोग कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या याबाबतचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. काँग्रेस शिवसेना करत राष्ट्रवादी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाटेवर असलेले महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका निवडणुका लढविणे जाणार असल्याची शक्यता आहे, मात्र याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध नसला तरी विरोध नसला तरी नाराजगी आहे , यावर आज पवार निर्णय घेणार आहेत.
महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, तिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा स्वतंत्र लढूया, तरुण कार्यकर्त्याना विसरू नको, तरुण नेत्यांना संधी द्या, 50 टक्के महिला, तरुण कार्यकर्ते, ओबीसी,आणि मागासवर्गीय लोकांना संधी देण्यासाठी प्रयत्न करूया